Premium|Indian women’s cricket history: भारतीय महिला क्रिकेटच्या यशस्वी प्रवासाची तीन ठोस पावले

Women’s World Cup India: सुनंदन लेले यांनी भारतीय महिला क्रिकेटच्या ५२ वर्षांच्या प्रवासाचे सुस्पष्ट वर्णन केले आहे. महेंद्रकुमार शर्मा यांच्या संघटनापासून जय शाह यांच्या प्रीमियर लीगपर्यंतच्या वाटचालीने हा क्रीडा इतिहास घडवला आहे
Women’s World Cup India

Women’s World Cup India

esakal

Updated on

डी. वाय. पाटील मैदानावर हरमनने विश्वचषक हाती घेतला. मग संपूर्ण संघाने मैदानाला फेरी मारत क्रिकेट चाहत्यांच्या कौतुकाचा स्वीकार केला. मग हरमनने शुभांगी कुलकर्णी, मिताली राज, झुलन गोस्वामी, नीलिमा बर्वेसह हजर असलेल्या महान माजी महिला खेळाडूंकडे स्वत: जाऊन त्यांना विश्वचषक हाती दिला. जितका हा विजय विजेतेपद मिळवणाऱ्या संघाचा आहे, तितकाच तो महिला क्रिकेटसाठी रक्त आणि घाम गाळणाऱ्या माजी खेळाडूंचा आहे, असेच हरमनला न बोलता सांगायचे होते.

घवघवीत यश मिळाल्यावर काही लोकांना कमालीची गुर्मी चढते तर काही मोजक्या लोकांना विनम्र व्हायला होते. २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यावर धोनी आणि सचिनने सुधीर गौतमला बोलावून विश्वचषक त्याच्या हाती देत संपूर्ण संघासह मानवंदना दिली होती. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी वर्षानुवर्षं भारतीय संघाला दिलेल्या आवाजी पाठिंब्याला दिलेली ती प्रतीकात्मक मानवंदना होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com