संपादकीय
आधुनिक शेती म्हणजे विज्ञान, सर्जनशीलता आणि साधनेचा त्रिवेणी संगम. पारंपरिक पद्धती, बदलते हवामान, बाजारपेठेतील अनिश्चितता आणि मनुष्यबळाची कमतरता अशा संकटांनी ग्रासलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स - एआय) रूपात आशेचा किरण दिसतो आहे.
शेतीच्या पूर्वापार चौकटी मोडून डेटा, अल्गोरिदम्स आणि मशिन लर्निंग यांचे बीज आज मातीत रोवले जात आहे. हे बीज कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेने परभणी येथे आयोजित केलेल्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या ५३ व्या बैठकीने अधिक सक्षमपणे पेरले आहे.