मुंबई: "काँग्रेस पक्ष हा माता भगिनींचे दागिने मंगळसूत्र ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना वाटणार" असा घणाघाती आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान मधील सभेदरम्यान केला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात याबाबतचा उल्लेख आहे असेही त्यांनी म्हणले आहे.
याला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले आहेत, आमचे सरकार आल्यानंतर आम्ही देशात सामाजिक आर्थिक सर्व्हेक्षण करून देशातील धनिकांकडे जी संपत्ती धनिकांकडे एकवटली आहे तिचे पुन्हा गरीबांमध्ये वाटप करू.
काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करत नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपांनंतर मात्र सर्वत्र फार मोठ्या प्रमाणात 'संपत्तीचे पुनर्वाटप' (wealth redistribution) हा मुद्दा चर्चिला जातो आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नेमकं काय म्हंटलं आहे? 'संपत्तीचे पुनर्वाटप' ही संकल्पना नेमकी काय? भाजपने केलेले आरोप काय? जाणून घेऊया या बातमीच्या माध्यमातून...