India Defence: भारतात राष्ट्रीय सुरक्षा धोरणाची आवश्यकता का आहे?
Rashtriya Suraksha Dhoran: जगात ज्या-ज्या देशांनी शिस्तीने, संघटित पद्धतीने आणि टप्प्याटप्प्याने आर्थिक विकास साधलेला आहे, त्या सर्व देशांनी त्यांचे ‘राष्ट्रीय सुरक्षा धोरण’ आखलेले आहे. अमेरिका, रशिया, पश्चिम युरोपीय देशांनी अशा धोरणाची आखणी केलेली दिसते. चीन, पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांनीही सर्वसमावेशक राष्ट्रीय सुरक्षा धोरणाची आखणी केली आहे.
जगात ज्या-ज्या देशांनी शिस्तीने, संघटित पद्धतीने आणि टप्प्याटप्प्याने आर्थिक विकास साधलेला आहे, संरक्षणक्षेत्रातील विकास साधलेला आहे, त्या सर्व देशांनी त्यांचे ‘राष्ट्रीय सुरक्षा धोरण’ आखलेले आहे. भारतालाही त्याची नितांत गरज आहे.