11th Admission : अकरावी प्रवेश प्रक्रियेत शिक्षण विभाग ‘नापास’ गोंधळाचे वातावरण; सॉफ्टवेअरमध्ये अडचण

Maharashtra Education : १२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली, पण संपूर्ण राज्यात प्रवेश यादी रखडली. शिक्षण विभाग पहिल्याच परीक्षेत 'नापास'?
11th Admission
11th AdmissionSakal
Updated on

पुणे : संपूर्ण राज्यातील तब्बल नऊ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या १२ लाख ७१ हजार २०१ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा ‘पेपर’ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाला अवघड गेला आहे. अकरावीच्या प्रवेशाची पहिल्या नियमित फेरीची निवड यादी, महाविद्यालयांचा कट-ऑफ गुरुवारी जाहीर होणार होता, परंतु संपूर्ण राज्यात अकरावीच्या ऑनलाइनद्वारे प्रवेशाचा हा ‘भार’ डोईजड झाल्याने शिक्षण विभाग प्रवेशाच्या पहिल्याच परीक्षेत ‘नापास’ झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com