काय सांगता ! लाॅकडाउनमध्येही भाजी विक्रीतून मिळविले २ लाख उत्पन्न; थेट ग्राहकांना केली मालाची विक्री

amol jadhav.jpg
amol jadhav.jpg
Updated on

पारगाव (पुणे)  : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील जिरायती गाव म्हणून ओळख असलेल्या धामणी येथील अमोल अंकुश जाधव या तरुणाने लॉकडाऊनच्या कालावधीत अवघ्या 28 गुंठे क्षेत्रातील शेतात पिकवलेला तरकारी माल दररोज 11 कॅरेटमध्ये भरुन ते कॅरेट मोटारसायकलवर बांधून 40 किलोमीटर अंतरावरील औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांना थेट विक्री करुन एक महिन्याच्या कालावधीत दोन लाख रुपयाचे उत्पन्न मिळवले. धामणी परिसरातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. ओढ्याच्या काठावर असलेल्या काही शेतकऱ्यांनी विहीर घेऊन त्या पाण्यावर तरकारी पिके घेत आहेत. द्रोणागिरी मळ्यातील अमोल जाधव या तरुणानेही विहीरीच्या पाण्याची सोय असल्याने आठ गुंठे क्षेत्रात भेंडी, 10 गुंठे क्षेत्रात दोडका व कारले आणि 10 गुंठे क्षेत्रात टोमॅटोचे पीक घेतले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मार्च महिन्यात देशात कोरोनो विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने शासनाने लॉकडाऊन लागू केला. शहरे बंद झाली, दळणवळण ठप्प झाले, सगळे व्यवहार थंडावले तरकारी मालाला मागणी नसल्याने बाजारभाव गडगडले. व्यापारी पड्याभावाने तरकारी माल मागू लागले. त्यामुळे अमोलने व्यापाऱ्यांना माल न विकता थेट ग्राहकांना माल विकण्याचा निर्णय घेतला. अमोल दररोज सकाळी आठ वाजता शेतात जाऊन मालाची तोडणी करत दुपारी तो माल कॅरेटमध्ये भरुन 40 किलोमीटर अंतरावरील सणसवाडी, चंदननगर व वाघोली परिसरातील ग्राहकांना थेट विक्री करु लागला. शेतकरी सर्वसाधारणपणे एकावेळी मोटार सायकलवर 6 ते 7 कॅरेट नेतात परंतु अमोल तब्बल 11 कॅरेट मोटारसायकलवर बांधून तरकारी माल विक्रीसाठी नेत होता. एकावेळी तो एकूण 175 ते 200 किलो तरकारी माल विक्रीला नेत असे.

सायंकाळी औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची सुट्टी होण्याच्या वेळेला तो मोक्याच्या ठिकाणी मोटारसायकल उभी करुन थेट ग्राहकांना तरकारी माल विकत होता. व्यापारी 25 ते 30 रुपये किलोने मागणारे तरकारी माल थेट ग्राहकांना विक्री केल्याने प्रती किलोला 50 रुपये भाव मिळत होता. ग्राहकांनाही 70 ते 80 रुपये किलोने मिळणारी तरकारी 50 रुपयाला मिळत होती. तीही ताजी त्यामुळे अमोलचा तरकारी माल काही वेळातच खपत असे. त्याने भेंडी विक्रीतून 50 हजार रुपये, दोडका व कारल्यातून 50 हजार रुपये टोमॅटो विक्रीतून एक लाख रुपये मिळवले असून टोमॅटोचे उत्पादन अजुनही सुरु आहे. शेतकरी ते थेट ग्राहक ही संकल्पना प्रत्यक्षात राबवून अमोलने मिळवलेले उत्पादन इतर शेतकऱ्यांना निश्चित आदर्शवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com