पुणे : नेपाळमध्ये कालच्या तुलनेत आज परिस्थिती थोडी सुधारली आहे. सैन्याने ताबा घेतल्यापासून या ठिकाणी काहीशी शांतता आहे. नागरिक घराबाहेर पडत आहेत. मात्र अद्यापही जनजीवन पूर्णपणे सुरळीत झालेले नाही. .तसेच विमानसेवादेखील सुरू झालेली नाही. त्यामुळे आम्ही कधी परत स्वदेशी येऊ, याची आस लागली आहे, अशी भावना नेपाळमध्ये अडकलेले पुण्याचे पर्यटक प्रसाद पाठक यांनी व्यक्त केली..नेपाळमध्ये झालेल्या आंदोलनामुळे राज्यातील ५० हून अधिक पर्यटक तेथे अडकले आहेत. त्यात पुण्यातील सुमारे दहा पर्यटक आहेत. पाठक हे पत्नी आणि त्यांच्या नातेवाइकांसह सोमवारी (ता. ८) काठमांडू येथे देवदर्शनासाठी गेले होते. पाठक यांचे मंगळवारी (ता. ९) दुपारी भारतात परत येण्यासाठी विमान होते. आंदोलन सुरू झाल्याचे समजल्याने ते वेळेआधीच विमानतळावर पोहोचले होते..मात्र त्यांच्या विमानाचे उड्डाण झाले नाही. त्यामुळे मंगळवारी त्यांना तेथेच थांबावे लागले. सध्या ते विमानतळाजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. ‘‘आम्हाला येथे चांगली सुविधा मिळत आहे,’’ असे पाठक म्हणाले. ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूरमधील पर्यटकांचा समावेश आहे. सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील आहेत. त्यापैकी बीडमधील ११ पर्यटक खासगी वाहनाने नेपाळमधून बाहेर पडले असून गोरखपूरला पोचले असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली. या पर्यटकांना परत आणण्यासाठी सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. या पर्यटकांना मदत करण्यासाठी राज्य शासन तत्पर आहे. सर्व पर्यटक सुरक्षित आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली..अनेक लोक विमानतळात अडकूनआंदोलन चिघळल्यानंतर अनेकांनी परदेशात किंवा स्वदेशी जाण्यासाठी विमानतळ गाठले होते. मात्र अचानक सर्व विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून काठमांडू येथील विमानतळावर अनेक जण अडकून पडले आहेत. तेथे त्यांची मोठी गैरसोय होत असल्याची माहिती आम्हाला समजली. सुदैवाने आम्ही हॉटेलमध्ये सुरक्षित आहोत, अशी माहिती पाठक यांनी दिली..गैरसोय; पण त्रास नाही‘‘नेपाळच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळे पर्यटकांना त्रास होणार नाही, याची काळजी आंदोलनकर्ते घेत असल्याचे दिसले. काल काही अपवाद वगळता अद्याप पर्यटकांना त्रास दिल्याच्या घटना नाहीत. मात्र त्यांच्या आंदोलनामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय झाली आहे. अनेकांना हॉटेलदेखील मिळाले नाही,’’ असे पर्यटनासाठी गेलेले प्रवीण मिटकरी यांनी सांगितले..Nepal protests : नेपाळमधील आंदोलनाचे सीमेवर पडसाद; परिस्थिती तणावपूर्ण भारतीय पर्यटकांना रोखलं.परतताना अडकलोआम्ही काठमांडू येथे देवदर्शनासाठी गेलो होतो. सोमवारी तेथे थांबून मंगळवारी परतण्याचे नियोजन होते. मात्र मंगळवारीच आंदोलन चिघळले. त्यामुळे आम्ही अडकून पडलो. अनेक भारतीय आम्ही थांबलेल्या हॉटेलमध्ये आहेत. तसेच इतर देशांतील पर्यटनदेखील येथे अडकले असल्याचे पाठक यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.