11 वी प्रवेशासाठी पहिल्या फेरीत एवढ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्‍चीत; तर....

admission
admission

पुणे - इयत्ता 11 वी प्रवेशासाठी पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असली तरी तीन दिवसात केवळ केवळ 15 हजार 101 जणांनी प्रवेश निश्‍चीत केले आहेत. तर 18 हजार 900 जणांनी अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. पहिल्या फेरीतील प्रवेश निश्‍चीतीसाठी गुरूवार शेवटचा दिवस आहे, अशी माहिती इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मिना शेंडकर यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे, पिंपरी-चिंचवड मधील कनिष्ठ महाविद्यालयातील 11 वी प्रवेशासाठी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. याप्रक्रियेत 304 महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यानंतर इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश नियंत्रण समितीने 30 ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली. 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या दरम्यान पहिल्या फेरीतील प्रवेश निश्‍चीत करणे आवश्‍यक आहे. पहिल्या फेरीसाठीच्या यादीत 40 हजार 13 विद्यार्थ्यांना समावेश असून, त्यात 19 हजार 575 जणांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

पहिल्या फेरीतील प्रवेश निश्‍चीतीसाठी गुरूवार (ता. 3) शेवटचा दिवस असून आत्तापर्यंत 21 हजार 113 जणांनी प्रवेश घेण्यास संतमी दर्शविली आहे. त्यापैकी 15 हजार 101 जणांनी महाविद्यालयात शुल्क भरून प्रवेश निश्‍चीत केले आहेत.

तर 18 हजार 900 जणांनी प्रतिसाद दिलेला नाही. शेवटच्या दिवशी प्रवेश निश्‍चीत केले जातील, त्यामुळे हा आकडा कमी होऊ शकतो. दरम्यान, पहिल्या पसंतीचे महाविद्यालय न मिळणे, घरापासून लांब असणे यासह अन्य कारणांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. दुसऱ्या फेरीसाठी गुरूवारी वेळापत्रक जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com