पुणे - दहावीत असतानाच पितृछत्र हरपलं. त्यामुळे आईवर घराची संपूर्ण जबाबदारी आली. मात्र, तिनं कधीही खचून न जाता शेती करत आम्हा भावंडांना शिकविले. मला अधिकारी होण्यासाठी कायमच प्रोत्साहन दिले. तिच्या कष्टामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मी लातूरहून पुण्यात आलो.