

Ajit Pawar
Sakal
हडपसर : गेल्या साडेतीन वर्षांपासून जिल्हा व शहरात असलेल्या प्रशासकराजमुळे सामान्य नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. या व आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून ते स्वतः नागरिकांना भेटून या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याची सुरुवात काल (ता. १३) हडपसर येथून झाली आहे. या कार्यक्रमांतर्गत सुमारे चार हजार तक्रारी त्यांच्यासमोर आल्या.