Akhil Bharatiya Grahak Panchayat Holds National Satyagraha Against MRP
sakal
मंचर - देशातील ग्राहकांना न्यायसंगत, पारदर्शक व वाजवी किंमत मिळावी, यासाठी विद्यमान एमआरपी (मॅक्सिमम रिटेल प्राइस) व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने शुक्रवारी (ता. १२) नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे राष्ट्रीय सत्याग्रह व धरणे आंदोलन करण्यात आले. देशातील विविध राज्यांमधून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.