Motivation News : आंबेगावचा सुपुत्र वैभव वाळुंज यांचा इंग्लंडच्या मंत्रालयाकडून सन्मान: उच्च शिक्षणासाठी ४५ लाख रुपये शिष्यवृत्ती

शिक्षणासाठी इंग्लंडमधील ब्रायटन नगरपालिकेसोबत वैभव यांनी केलेल्या विविध राबविलेल्या उपक्रमांबद्दल सरकारने त्यांच्या कामाची घेतली दखल.
Vaibhav Valunj
Vaibhav Valunjsakal

मंचर - १६० पेक्षा अधिक देशांमधून आलेल्या चार हजार विद्यार्थ्यांमधून शिक्षण व्यवस्थेत तसेच विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी काम करून सर्वाधिक योगदान दिल्याबद्दल इंग्लंडच्या राष्ट्रकुल मंत्रालयाने आंबेगाव तालुक्यातील वाळुंजनगर-लोणी येथील वैभव भाऊसाहेब वाळुंज या युवकाला गोल्ड वॉलंटीयर पुरस्काराने सन्मानित केले आहे. इंग्लंड सरकारच्या ४५ लाख रुपये शिष्यवृत्ती रकमेतून त्याचे उच्च शिक्षण होणार आहे. आंबेगाव तालुक्याचे नाव सात समुद्रापार नेल्याबद्दल वैभवचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिक्षणासाठी इंग्लंडमधील ब्रायटन नगरपालिकेसोबत वैभव यांनी केलेल्या विविध राबविलेल्या उपक्रमांबद्दल सरकारने त्यांच्या कामाची दखल घेतली. इंग्लंडच्या संसदेत परराष्ट्र मंत्रालयात ब्रिटन सरकारच्या चेवनिंग शिष्यवृत्तीच्या प्रमुख लुईस थॉमसन यांच्या हस्ते वैभव यांचा सन्मान झाला.

“वैभव यांनी इंग्लंडमध्ये शिकत असताना तेथील नगरपालिकेच्या शाळकरी मुलांसाठी धोरण व नियोजननिर्मिती करण्यात हातभार लावला. ‘स्टेप टू’ सामाजिक संस्थेच्या तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अभ्यासक्रम निर्मिती, वार्षिक अहवाल लेखन तसेच शाळा विकास कार्यक्रमात भूमिका बजावली.

  • विकास क्षेत्रातील जगातील सर्वोत्तम विद्यापीठ असलेल्या युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्सकडून सरकारी धोरण निर्मिती या क्षेत्रात पदवी वैभव यांना प्रदान करण्यात आली. इंग्लंडमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी भारत सरकारच्या नीती आयोग व राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग आणि भारताच्या संसदेत अर्थव्यवस्था, शिक्षण व राजकारण संशोधनपर काम.

  • इंग्लंडमध्ये स्थानिक प्रशासन, आफ्रिका खंडातील मोरोक्को, मॉरीटेनिया, सेनेगल व गांबीया या देशांचे सरकारांसोबत धोरण सल्लागार म्हणून कामकाज.

  • भारत, इंग्लंड आणि गांबीया देशाच्या संसदेमध्ये गौरव.

  • संसदेत विविध खासदारांबरोबर धोरण निर्मिती करण्यासाठी मदत केल्याबद्दल संशोधनपर लेखनाच्या माध्यमातून मानाचा रेडइन्क पुरस्कार.

२१ व्या वर्षी विदेशात शिक्षण घेण्यसाठी ते मार्गस्थ झाले.जिद्दीच्या जोरावर त्यांनी यश संपादन केले.'

'दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे. यूपीएससी-एमपीएससी या स्पर्धा परीक्षाप्रमाणेच जगभरातील नवनव्या संधी शोधाव्यात. संशोधन-उद्योजकतेत उच्च शिक्षण घेऊन करिअर करावे. त्यासाठी स्टेप-टू संस्थेच्या माध्यमातून मार्गदर्शन व प्रयत्न सुरु आहेत.'

- वैभव वाळूंज, संस्थापक अध्यक्ष स्टेप-टू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com