

IndiGo flight took off without 50 passengers in Mumbai
sakal
मंचर : मुंबई–अबुधाबी इंडिगो विमानाच्या वेळेवर निर्गमनाच्या नावाखाली तब्बल ५० प्रवाशांना अवघ्या दहा मिनिटांसाठी बोर्डिंग न देता टेकऑफ केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडला आहे. या मनमानी निर्णयामुळे आंबेगाव खेड व जुन्नर तालुक्यातीलप्रवाशांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान तर झालेच; शिवाय शारीरिक व मानसिक छळही सहन करावा लागला आहे
. “आमची कोणतीही चूक नसताना इंडिगोने आम्हाला वाऱ्यावर सोडले,” असा संतप्त आरोप चंद्रकांत बांगर व नंदा पडवळ या प्रवाशांनी केला आहे.