

Indian independence movement
sakal
पुणे : ब्रिटिश हे भारतातील नैसर्गिक स्रोतांचे आणि मनुष्यबळाचे शोषण करीत होते, त्याविरोधात दादाभाई नौरोजी यांनी चळवळ उभी केली. त्यांनी सातत्याने भारतातील आर्थिक शोषणाविरोधात लढा दिला. ब्रिटिश सरकारला प्रश्न विचारत सळो की पळो करून सोडत ते शोषितांचा आवाज बनले’’ असे मत सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ, इतिहास आणि संविधान अभ्यासक अनिल नौरिया यांनी व्यक्त केले.