केंद्राच्या नवीन निर्यात धोरणांमुळे शेतकऱ्यांचा फायदा ; जास्तीतजास्त साखर निर्यात आणि अधिक भाव

Ankita Patil has expressed confidence that farmers will get maximum prices.jpg
Ankita Patil has expressed confidence that farmers will get maximum prices.jpg

इंदापूर (पुणे) : केंद्राने जाहीर केलेल्या नवीन निर्यात धोरणामुळे देशातील कारखाने जास्तीत जास्त साखर निर्यात करतील. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळेल, असा विश्वास कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनची 86 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्स माध्यमातून केंदीय रेल्वे, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली. यावेळी इस्माच्या सर्वात तरुण सदस्या व कायदेशीर समितीच्या सह अध्यक्षा अंकिता पाटील यांनी साखर उद्योग व निर्यात धोरणाबद्दल आपले विचार व्यक्त केले.

यावेळी साखर कारखानदारी बाबतीतील अडचणींवर चर्चा झाली. तसेच केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी व साखर उद्योगासाठी  महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानण्यात आले. यावेळी भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणी व चालू गाळप हंगाम परिस्थिती बाबतशिफारस ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या वतीने केंद्र सरकारला पाठविण्याबाबत चर्चा झाल्याचे अंकिता पाटील यांनी शेवटी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com