

Hailstorm Damages Crops in Ardhapur Taluka
Sakal
अर्धापूर : अर्धापूर, (जिल्हा नांदेड)तालुक्यात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली असून केळी, टरबूज खरबूज, गहू, ज्वारी अंबा व भाजीपाला पिकांना खुप मोठा फटाका बसला आहे.या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले असून सुमारे अडीचशे हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. .नुकसानग्रस्त भागाची तालुका प्रशासनाने पाहणी केली आहे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करित आहेत.