
भामा-आसखेड धरणातून पुण्यासाठी मिळणाऱ्या पाण्यातून आळंदी शहरासाठीही दिली जाते.
पुणे - भामा-आसखेड धरणातून पुण्यासाठी मिळणाऱ्या पाण्यातून आळंदी शहरासाठीही दिली जाते. पण आळंदी नगर परिषदेने पाणी पट्टी व पंपिंगचे २५ लाख ५३ हजार रुपये न भरल्यास १ आॅक्टोबरपासून आळंदीचा पाणी पुरवठा बंद करू असा इशारा महापालिकेने आळंदी नगर परिषदेला दिला आहे. त्याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे.
पुणे शहरासाठी भामा आसखेड धरणातून २.६१ टीएमसी पाणी कोटा मंजूर झाला आहे. भामा आसखेड ते पुणे शहर अशी सुमारे ६५ किलोमीटरची जलवाहिनी टाकून पाणी आणले जाते. यामुळे नगर रस्ता परिसरातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे. पण आळंदी नगर परिषदेकडूनही भामा आसखेड धरणातून पाण्याची मागणी केली जात आहे. त्यांना अद्याप पाणी कोटा मंजूर झालेला नाही तो पर्यंत तीन महिने महापालिकेने प्रक्रिया न केलेले पाणी आळंदी शहरासाठी देण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी ९ फेब्रुवारी दिला होता. त्यानुसार १७ फेब्रुवारीपासून महापालिकेकडून आळंदी शहरासाठी पाणी दिले जाते.
त्यानुसार १७ फेब्रुवारी ते ३१ मार्च या दिवसाचे ६ लाख २ हजार ५८१ रुपये पहिले बिल पाठविण्यात आले. त्यानंतर १ एप्रिल २०२२ ते ३० जून २०२२ पर्यंतचे १९ लाख ५१ हजार ११७ रुपयांचे दुसरे बिल पाठविण्यात आले आहे. हे बिल भरावे यासाठी महापालिकेने वेळोवेळी स्मरणपत्र पाठवले आहे. पण आळंदी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना लेखी किंवा फोनवरून कोणताही संवाद महापालिकेशी साधलेला नाही. आळंदी नगर परिषदेकडून मिळणे अपेक्षीत असलेली २५ लाख ५३ हजार ६९८ पाटबंधारे विभागाला भरायचे आहेत, त्यामुळे ही रक्कम द्यावी अशी मागणी महापालिकेने केली आहे. जर ही रक्कम भरली तर पूर्व सूचना न देता १ आॅक्टोबर २०२२ पासून महापालिकेकडून पाणी पुरवठा बंद केला जाईल, असा इशारा पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.