

sakal
परिंचे : ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकार समाज घटकांच्या विकासासाठी कायमच तत्पर आहे. आजच्या काळातील आव्हाने बदलली आहेत. त्यामुळे समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाची संधी, रोजगाराचे मार्ग, कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि मूलभूत सुविधा यांना अधिक महत्त्व आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून भटके-विमुक्त, व्हीजेएनटी, ओबीसी आणि एसबीसी या समाजातील नागरिकांना या विविध क्षेत्रांत पुढे जाण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे,’’ असे मत इतर मागासवर्गीय व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.