
Bacchu Kadu
Sakal
घोरपडी : दिव्यांग बांधवांनाही बंगला, गाडीसह सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. नागपूरला मोठ्या संख्येने या, आपल्या काही मागण्या पूर्ण झाल्या असल्या तरी उर्वरित मागण्या पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे एकत्रित लढा देणे गरजेचे आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारला जसे नमवले तसे आपण नागपूरच्या आंदोलनात सहभागी होऊन मुख्यमंत्र्यांना नमवून दिव्यांगांचा झटका त्यांना दाखवू, असा इशारा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला.