Balbharati Book
sakal
पुणे - ‘बालभारती’च्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. चौथीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकात थेट भारतीय गणितज्ञांच्या निधनाची तारीखच बदलण्याचा अक्षम्य पराक्रम ‘बालभारती’ने केला आहे. केवळ इतिहासच नव्हे, तर ‘लांबी-वजन’ आणि ‘भागाकार’ या पाठातील संकल्पना आणि आकड्यांमध्येही गणिताचे धडे देणाऱ्यांनीच प्रचंड घोळ घातला आहे. या गंभीर चुकांमुळे बालभारतीचे ‘बिनचूक’ पाठ्यपुस्तकांचे गणित पुरते बिघडले आहे. एवढंच नव्हे, लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ मांडल्याचे स्पष्ट होत आहे.