Baramati Farmers Approach Deputy CM Sunetra Pawar in Mumbai
sakal
माळेगाव - निरा डावा कालव्याचे पाण्याचे आवर्तन अचानकपणे बंद झाल्याने बारामती तालुक्यातील २४ फाटा परिसरातील सुमारे अडीच हजार एकर सिंचन क्षेत्र पाण्यापासून वंचित राहिले आहे. परिणामी ऊसासह चारा पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मेखळी, घाडगेवाडी, निरावागज, गुणवडी, मळद आणि खांडज येथील शेतकरी बांधवांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.