

धुमाळवाडी ( ता.बारामती) येथे गारपिटासह अवकाळी पावसाने तडाका दिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Sakal
माळेगाव : बारामती तालुक्यातील धुमाळवाडी, पवईमाळ आदी भागांमध्ये आज सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने आणि भीषण गारपीटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. काही मिनिटांतच निसर्गाच्या या तडाख्याने उभ्या पिकांची अक्षरशः राखरांगोळी झाली असून शिवारात सर्वत्र हाहाकार माजला आहे.