
बारामती : यंदा आठवडाभर आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. अशातच मागील तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने राज्यभरात रौद्ररूप दाखवले आहे. यामुळे अनेक भागात दरड, वीज, झाडे कोसळण्याचं घटना घडल्या असून काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून अतिवृष्टीचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.