Barsu Refinery Protest : समृध्दी मार्गातही तक्रारी होत्या पण...रिफायनरी प्रकरणावरून अजित पवार काय म्हणाले ?

या प्रकल्पाबाबतही विकासाच्या प्रकल्पांना आमचा विरोध नाही, मात्र या कामामुळे पर्यावरणाचा -हास होता कामा नये, पर्यावरणवाद्यांशीही गरज असल्यास सरकारने बोलावे, तक्रारदारांच्या तक्रारीत तथ्य असेल तर प्रश्न मार्गी लावावा.
Barsu Refinery Protest & Ajit pawar
Barsu Refinery Protest & Ajit pawarsakla

Barsu Refinery Protest- बारसू रिफायनरी प्रकरणात सरकारने आंदोलनकर्त्यांची भूमिका समजून घ्यायला हवी, विकासकामांना आमचा कधीच विरोध नव्हता व नसेलही मात्र मुस्कटदाबी करुन चालणार नाही, चर्चेतून मार्ग काढावा, अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बोलून दाखविली.

बारामतीत आज ते माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत तेथीलजनतेशी सरकारने संवाद साधायला हवा. समृध्दी मार्गाबाबतही अनेकांच्या तक्रारी होत्या, मात्र त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना योग्य मोबदला देऊन भूसंपादन करण्यात आले. एनरॉनच्या बाबतही असाच विरोध झाला होता.

Barsu Refinery Protest & Ajit pawar
Mumbai : मुंबई-सोलापूर ’वंदे भारत’ एक्सप्रेसवर दगडफेक !

या प्रकल्पाबाबतही विकासाच्या प्रकल्पांना आमचा विरोध नाही, मात्र या कामामुळे पर्यावरणाचा -हास होता कामा नये, पर्यावरणवाद्यांशीही गरज असल्यास सरकारने बोलावे, तक्रारदारांच्या तक्रारीत तथ्य असेल तर प्रश्न मार्गी लावावा.

तथ्य नसेल तर त्यांना समजून सांगावे, योग्य मोबदला द्यावा, सरकारने यात समन्वयाची भूमिका घेणे गरजेचे आहे. सरकारने या प्रकरणी आंदोलनकर्त्यांची भूमिका समजून घेणे गरजेचे आहे, असे अजित पवार यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com