

मंचर: सन २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांसाठी पर्यावरणाचा समतोल राखत ६०० कोटी रुपयांहून अधिक निधीतून विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. या विकास आराखड्यामुळे पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच दुर्गम भागातील आदिवासी बांधवांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.