Train Accident : एक्सप्रेस ट्रेनच्या धडकेत ४०० मेंढ्याचा मृत्यू, रुळावरुन वाहिला रक्ताचा पाट, कोल्ह्यांचा कळपावर हल्ला अन्...

Train Accident : कोल्हे आणि कुत्र्यांनी मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केल्यानंतर त्या घाबरून रेल्वे ट्रॅक ओलांडू लागल्या. याच दरम्यान एक्सप्रेस ट्रेनने मेंढ्या चिरडल्या. हा अपघात इतका भीषण होता की रुळावर रक्ताचा पाट वाहिला.
Train Accident : एक्सप्रेस ट्रेनच्या धडकेत ४०० मेंढ्याचा मृत्यू, रुळावरुन वाहिला रक्ताचा पाट, कोल्ह्यांचा कळपावर हल्ला अन्...
Updated on

थोडक्यात

  1. बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात एक्सप्रेस ट्रेनच्या धडकेत ४०० मेंढ्यांचा मृत्यू झाला.

  2. कोल्हे आणि कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या मेंढ्या रेल्वे ट्रॅकवर गेल्या आणि गाड्यांनी चिरडल्या.

  3. सुमारे १८-२० लाख रुपयांचे नुकसान झाले असून नुकसानभरपाईसाठी प्रयत्न सुरू आहेत.

बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात एक मोठा अपघात घडला आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय पाटणा रेल्वे विभागाच्या सिकारिया-बनाही स्टेशनजवळ दोन गाड्यांनी मेंढ्यांच्या कळपाला चिरडले आहे. या अपघातात सुमारे ४०० मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोल्हे आणि कुत्र्यांनी मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केल्यानंतर त्या घाबरून रेल्वे ट्रॅक ओलांडू लागल्या. याच दरम्यान एक्सप्रेस ट्रेनने मेंढ्या चिरडल्या. हा अपघात इतका भीषण होता की रुळावर रक्ताचा पाट वाहिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com