

Shirur Farmer Gets Justice After 37 Years High Court Cancels Illegal Land Acquisition Sets Landmark Precedent
sakal
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील शेतकरी नामदेव खेडकर यांचा ३७ वर्षांचा न्यायालयीन लढा यशस्वी ठरला आहे. नुकसान भरपाई न देता व प्रत्यक्ष ताबा न घेताच त्यांची जमीन दुसऱ्या प्रकल्पग्रस्ताला वाटप केल्याने उच्च न्यायालयाने हे भूसंपादन रद्द केले. या पथदर्शी निकालामुळे राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.