महाराष्ट्रातील बोर्डाच्या परीक्षा होणार की नाही? शिक्षणमंत्री घेणार निर्णय

varsha gaikwad
varsha gaikwad

पुणे - सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. त्यामुळे राज्यातल्या परीक्षांचे काय होणार असा प्रश्न पडला आहे. महाराष्ट्रात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचे आधीच जाहीर केले आहे. परंतु सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आता महाराष्ट्रातही दहावीच्या परीक्षा रद्द होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मुंबईत सचिव स्तरावर संपर्क साधला असता, परीक्षा रद्द करण्याचा निर्णय होणार नाही. मात्र, शिक्षणमंत्री यावर अंतिम निर्णय घेतील, असे सांगण्यात आले.

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी केली होती. आता सीबीएसई बोर्डाच्या परीक्षाबाबत केंद्राने निर्णय जाहीर केला असला तरी राज्यातल्या परीक्षा रद्द केल्या जाणार नाहीत. परीक्षा महत्त्वाच्या आहेत आणि त्या रद्द करून चालणार नाहीत. त्याच्या आधारेच पुढचे प्रवेश होतात अशी माहिती समजते.

राज्यातील एससी आणि एचएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यानंतर केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या बैठकीनंतर सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय़ घेतला गेला. दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती देण्यात आली. बारावीच्या परीक्षा 4 मे रोजी सुरु होणार होत्या. आता या परीक्षा 14 जूननंतर होतील. तसंच 1 जूनला कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com