Om Avdhiya
sakal
पुणे - कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातानंतर अल्पवयीनांकडून होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. विशेषतः १६ वर्षांवरील मुलांकडून गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्यास केवळ त्यांचे वय लक्षात न घेता, गुन्ह्याचे स्वरूप आणि गांभीर्य विचारात घेऊन कठोर कारवाईची तरतूद कायद्यात असावी, अशी मागणी अपघातातील मृत अनिश अवधिया यांचे वडील ओम अवधिया यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.