'मुख्यमंत्र्याने इतर झेंडा घेऊन बसूच नये'; तिरंग्याच्या बरोबरीतल्या भगव्याबाबत आक्षेप

'मुख्यमंत्र्याने इतर झेंडा घेऊन बसूच नये'; तिरंग्याच्या बरोबरीतल्या भगव्याबाबत आक्षेप

पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून संबोधन केलंय. आज रविवारी रात्री आठ वाजता त्यांनी जनतेशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा आणि भविष्यातील नियोजनाबाबत मांडणी केली. तसेच त्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीबाबत, मराठा आरक्षणाबाबतही काही महत्त्वाची वक्तव्ये केलीत. हे संबोधन त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन केलंय. मात्र, त्यांच्या या संबोधनावेळच्या एका बाबीवरुन सध्या नव्या चर्चेला तोंड फुटलंय. उद्धव ठाकरेंच्या मागे असलेला तिरंगा झेंडा आणि भगवा झेंडा यांच्या उंचीवरुन आणि मान-सन्मानावरुन ही चर्चा सुरु झालीय. याबाबत मानवाधिकार कार्यकर्ते असीम सरोदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे विनंतीवजा आक्षेप नोंदवला आहे. असीम सरोदे यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे.

'मुख्यमंत्र्याने इतर झेंडा घेऊन बसूच नये'; तिरंग्याच्या बरोबरीतल्या भगव्याबाबत आक्षेप
आरक्षणाची ५० टक्के मर्यादा व्हावी शिथिल; प्रमुख नेत्यांसोबत CM ठाकरेंची बैठक
'मुख्यमंत्र्याने इतर झेंडा घेऊन बसूच नये'; तिरंग्याच्या बरोबरीतल्या भगव्याबाबत आक्षेप
मुंबई लोकल होणार सुरू.. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी!

उद्धव ठाकरे यांच्या मागे उजव्या बाजूला तिरंगा दिसून येतो. तर त्यांच्या डाव्या बाजूला भगवा झेंडा दिसून येतो. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख असले तरी सध्या ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आहेत. भगवा हा शिवसेनेचा झेंडा आहे. मात्र, तिरंगा झेंड्याच्या उंचीपेक्षा कोणताही झेंडा उंच असून चालत नाही. याचीच आठवण असीम सरोदेंनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांना करुन दिली आहे.

असीम सरोदे यांनी म्हटलंय की, भारताच्या तिरंगा झेंड्याच्या वरच्या पातळीवर तसेच बरोबरीने इतर कोणताही झेंडा असू नये, हा साधा नियम पाळावा अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती. खरे तर मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने इतर झेंडा घेऊन बसूच नये.

पुढे ते म्हणालेत की, दुर्दैव आहे भारतीय लोकशाहीचे की आज आपल्या देशात राष्ट्रध्वज केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला उत्सवी स्वरूपात मिळविण्याच्या कामाचे राहिले आहेत की काय असा प्रश्न पडतो. अनेकांसाठी त्यांचे राजकीय पक्षांचे ध्वज व धर्मध्वजच महत्वाचे आहेत. इतर कोणातच ध्वज महत्वाचा नसलेले भारतीय नागरिकच या देशाला अखंड ठेवतील. लोकशाही अशाच नागरिकांच्या व नेत्यांच्या शोधात आहे. भारतीय ध्वज संहिता indian flag code सगळ्यांनी वाचवा तसेच याबाबतच्या नियमांची माहिती घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com