dr. mohan agashe
sakal
पुणे - ‘बुद्धिवादी शिक्षण हे स्वयंकेंद्रित असल्यामुळे जगण्याविषयी संवेदना निर्माण झालेल्या नाहीत. आधुनिक बुद्धिवादी शिक्षण पद्धतीतून केवळ वाचक निर्माण झालेत, उत्तम प्रेक्षक व श्रोते नाही. सध्या बुद्धीची भाषा शिकविली जाते परंतु संवेदनांची भाषा शिकविली जात नाही,’ अशी खंत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केली. ‘जीवनाच्या सर्वात जवळ जाणारे आणि भावनेचे माध्यम हे चित्रपट आहे,’ असेही ते म्हणाले.