

CM Devendra Fadnavis
Sakal
पुणे : ‘‘सीओईपीसारख्या नावाजलेल्या आणि दीर्घ परंपरा लाभलेल्या संस्थांमधून होणारे संशोधन समाजाच्या सर्वांगीण समृद्धीसाठी आवश्यक आहे. ‘सीओईपी’सह इतर शैक्षणिक संस्थांना अधिक स्वायत्तता उपलब्ध करून दिल्यास त्यांचे संशोधन अधिक फलद्रूप होईल. संशोधकांची संशोधक वृत्ती जोपासण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य असेल तरच संशोधक मोकळ्या आणि मुक्त मनाने संशोधन करू शकतात, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.