agriculture loss by heavy rain
sakal
- पांडुरंग साठे
कोळवण - मुळशी तालुक्यात रविवार तारीख ०५ पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे भात रोपवाटिका गाळ दगड गोटे यांनी गाडल्या आहेत. तर पुराचे पाण्यामुळे शेतीचे बांध तुटल्याने भात खाचरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी महसूल यंत्रणेला तातडीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश आज ता. ०७ रोजी दिले आहेत.