बारामती - कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत आहे. लोकांकडून काळजी घेतली जात नसल्यानं कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याचं याआधीही तज्ज्ञांनी सांगितलं होतं. कोरोनाची आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी आलेले संशयित स्वॅब दिल्यानंतरही किमान तीस तास मोकळेपणाने सर्वत्र वावरतात. यामुळे संसर्ग वेगाने होत असल्याचा अनेकांचा निष्कर्ष आहे.
आरटीपीसीआरची तपासणी करणारी बारामतीत शासकीय तीन तर खाजगी दोन प्रयोगशाळा आहेत. या पैकी विविध ठिकाणी लोक जाऊन तपासणी करतात. आरटीपीसीआर साठी स्वॅब घेतल्यानंतर दुस-या दिवशीच त्याचा अहवाल प्राप्त होतो. यात जे रुग्ण पॉझिटीव्ह असतात ते स्वॅब दिल्यानंतर घरातल्यांसह बाहेरील लोकांच्याही संपर्कात येत असतात. तपासणी झाल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत आपण पॉझिटीव्ह की निगेटीव्ह हे अनेकांना माहिती नसल्याने ते बिनधास्त फिरत राहतात.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
रुग्णाचे स्वँब सॅंपल तपासणीसाठी घेण्यात आलेले आहे. अशा रुग्णाला त्याचा अहवाल निगेटीव्ह येईपर्यंत बाहेर सोडू नये, अशी अनेकांची मागणी आहे. त्याचा अहवाल निगेटीव्ह आला तरच त्याला बाहेर जाऊ द्यावे, जे पॉझिटीव्ह येतील ते किमान गावात न फिरल्याने अनेकांना संसर्ग होण्यापासून वाचेल व रुग्णसंख्या कमी होईल, असे अनेकांचे मत आहे. ज्या ठिकाणी स्वँब घेतला जातो अशा ठिकाणी रुग्णांना अनिवार्यपणे थांबवून घेण्याशिवाय पर्यायच नाही, असे डॉक्टरांनाही वाटत आहे.
तपासण्यांची संख्या वाढविण्यावर शासनाचा भर असताना अहवाल येईपर्यंत संबंधितांना थांबवून ठेवणे तांत्रिकदृष्टया प्रशासनालाही गैरसोयीचे वाटत आहे. मात्र अनेक पॉझिटीव्ह रुग्ण अहवाल येईपर्यंतही अनेकांच्या संपर्कात येत राहतात ही वस्तुस्थिती सर्वांनाच मान्य आहे.
"ज्यांची तपासणी करायची आहे त्यांच्या बँचेस पाडून जसा अहवाल येईल त्या नुसार रुग्णाला घरी सोडता येणे शक्य आहे. या बाबतची शक्यता तपासून पाहत आहोत, या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेऊ."
- डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.