पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात आपल्या रोजच्या जीवनशैलीत मोठे बदल झाले आहे. लॉकडाउनच्या काळात बदललेले जीवनचक्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या, त्या अनुषंगाने तयार झालेले चिंताग्रस्त वातावरण, वर्क फ्रॉम होम, असे एक ना अनेक बदल आपले मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करत आहे. त्यामुळे रोजची झोप पुरेशा प्रमाणात घेणे, आता आवश्यक झाल्याचे डॉक्टर सांगतात. जागतिक झोप दिनानिमित्त डॉक्टरांशी संवाद साधले असता त्यांनी हे निरिक्षण नोंदविले. मानसिक ताणतणावात झोपेचे चक्र बिघडल्यास त्याचा रोजच्या व्यवहारांवर आणि आरोग्यावर मोठा परिणाम होतो. अशा साथीच्या काळात तर शांत झोपेचे महत्त्व अधिकच वाढले आहे. नागरिकांनी दुपारची झोप टाळून, रात्रीच्या वेळी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
झोपेचे गणित
शांत झोपेसाठी
हे करा...
हे करू नका
कोरोनामुळे झोपेबरोबरच मनःशांती हरवली आहे. योग्य आहार, व्यायामाबरोबच झोपेचीही नितांत गरज आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती शाबूत राहते. योग्य वेळी योग्य झोप घेणे आवश्यक आहे.
- डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.