(व्हिडिओ) केंद्राच्या पॅकेजवर अमोल कोल्हे यांची सडकून टीका, पहा काय म्हणाले... 

dr Amol Kolhe
dr Amol Kolhe

मंचर (पुणे) : ""केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेले पॅकेज म्हणजे आकड्यांचा खेळ असून, लॉकडाउनमधून बाहेर पडण्याचा आराखडा केंद्राकडे अद्याप तयार नाही. त्यामुळे लॉकडाउन उघडल्यानंतर कोरोनाचा धोका अधिक वाढू शकतो,'' असा इशारा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला आहे. 

डॉ. कोल्हे म्हणाले, ""लॉकडाउन हा कोरोनाला रोखण्यासाठी एकमेव पर्याय नाही, हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. पण, देशात कोरोना चाचण्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे आपण स्वत:ला फसवतो की जगाला, हेच कळत नाही. त्याचवेळी महाराष्ट्र सरकार चांगल्या प्रकारे काम करीत असून, चाचण्यांची संख्या जास्त असल्यानेच राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचे दिसते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.'' 

""केंद्राच्या समितीसमोर आपण सहा प्रमुख सूचना केल्या होत्या. त्यातील स्थलांतरित कामगारांचा प्रश्‍न वगळता अन्य विषयांवर कार्यवाही झाली नाही. लॉकडाउन सुरू झाल्यापासून केंद्र सरकारकडून येणाऱ्या सूचना आणि आदेशांचा गोंधळ सुरू असल्याचा फटका नागरिकांना बसतो आहे,'' असा आरोप कोल्हे यांनी केला.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दीर्घकाळ लॉकडाउन नको...              ""राज्याराज्यात समन्वय नसल्याने आपल्या राज्यात परतणाऱ्या नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दीर्घकाळ लॉकडाउन हा देशहिताचा नाही,'' असे मतही डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com