

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे एका २१ वर्षीय तरुणीचे भररस्त्यात अपहरण झाल्याची खळबळजनक घटना १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. ही घटना लग्नाच्या खरेदी करून घरी परतत असताना घडली असून तरुणीचे लग्न २२ फेब्रुवारीला होते. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांनी पुणे-सोलापूर महामार्ग रोखून धरला आणि भिगवण बंदची हाक दिली.