
लोणी देवकर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. अशातच पुणे- सोलापूर महामार्गावरून वरकुटे पाटी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीतून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ छोट्या-मोठ्या पालख्यांमधील वैष्णवांना रस्त्याच्या दुतर्फा पसरलेल्या घाणीमुळे नाकाला रुमाल लावून हरिनामाचा गजर करावा लागत आहे.