धायरीत प्रचंड वाहतूक कोंडी, शिवसेना ठाकरे गटानं सांगितलं कारण; वाहतूक विभागाला दिलं निवेदन

Pune : धायरीतील पारी चौक परिसरात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असून त्यामागचं कारण काय आहे आणि उपयायोजना काय करायला हव्यात याबाबत शिवसेना ठाकरे गटानं वाहतूक विभागाला निवेदन दिलंय.
Dhayari Traffic Jam: Shiv Sena UBT Submits Complaint
Dhayari Traffic Jam: Shiv Sena UBT Submits ComplaintEsakal
Updated on

धायरी (नऱ्हे) येथील पारी चौक परिसरात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्यानं वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांनाही मोठा त्रास होत आहे. यावर तातडीने उपयायोजना कराव्यात अशी मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे. यातच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून वाहतूक विभागाला एक निवेदन देण्यात आलंय. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे विभागप्रमुख महेश राजाराम पोकळे यांनी वाहतूक कोंडीवर उपयायोजना कराव्यात अशी विनंती केलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com