Dimbhe Dam Rehabilitation
Sakal
मंचर : हुतात्मा बाबू गेनू ( डिंभे धरण) क्षेत्रातील धरणग्रस्तांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसन आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांचा तातडीने निपटारा करण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, तसेच आंबेगाव तालुक्यातील २३ गावांतील २७६ कुटुंबाना जमीन व घरांसाठी भूखंड पुनर्वसन प्रस्ताव ता.३१ ऑगस्टपर्यंत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे निर्देश राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.