Dr. Baba Adhav : राज्यघटनेतील मूल्यांची जोपासना व्हावी; डॉ. बाबा आढाव

ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव यांचे मत; सम्यक पुरस्कारांचे वितरण
Dr Baba Adhav statement values enshrined Constitution should upheld secular and egalitarian nation
Dr Baba Adhav statement values enshrined Constitution should upheld secular and egalitarian nationSakal

पुणे : देशातील सत्ताधाऱ्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या सरनाम्यात दिलेल्या समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि विज्ञानाधिष्ठित समाज या घटनात्मक मूल्यांची सध्या मोठी उपेक्षा केली जात आहे. धर्मनिरपेक्ष आणि समतेच्या राष्ट्रासाठी या मूल्यांची जोपासना होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात या मूल्यांच्या विरोधात सातत्याने जाणीवपूर्वक कृती केली जात आहे.

या जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या कृतीमागे भारताला धर्माचे राज्य निर्माण करण्यामागची महत्वाकांक्षा दडलेली दिसते आहे. परंतु भारत हे कदापीही कोण्या एका धर्माचे राष्ट्र कदापीही होऊ शकणार नाही. ते कायम समतेचे राष्ट्र राहील, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव यांनी बुधवारी (ता.१०) येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केले.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सम्यक पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आंबेडकरी विचारवंत वसंत साळवे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष मुन्वर कुरेशी,ॲड. किरण कदम, मुख्य पुरस्कारार्थी व चित्रपट अभिनेते किरण माने, अन्य पुरस्कारार्थी व आदर्श शिक्षक प्रा. के. व्ही. सोनकांबळे, ज्येष्ठ समाजसेवक गुलाब गजरमल, रमेश राक्षे, निवृत्त अधिकारी शरद जाधव, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष रामहरी ओव्हाळ, उत्तम वनशिव, आयोजक नागेश भोसले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. आढाव पुढे म्हणाले, ‘‘देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातच सरकारला राज्यघटनेचा विसर पडला आहे. या वर्षात घरोघरी तिरंगा लावा म्हणणारे सरकार घरोघरी संविधान असा उपक्रम का राबवत नाहीत? पण त्यांना तसे करायचेच नाही.

म्हणूनच घटनात्मक मूल्यांबाबत सरकारकडून कमालीची उपेक्षा केली जात आहे. घटनात्मक मूल्यांची ही उपेक्षा थांबायला हवी. यासाठी घराघरांत संविधान देण्याची गरज आहे. मात्र केवळ घराघरांत संविधान देऊन चालणार नाही तर, त्यातील मूल्यांची जोपासना व्हायला हवी.’’

ॲड. किरण कदम यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सम्यक पुरस्कार देण्यामागची भूमिका विशद केली. अभिनेते किरण माने, मुन्वर कुरेशी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गायक स्वप्नील पवार व मेघानंद जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संतोष संखद यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमानंतर संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com