सरपंच असावा तर असा, दहा गावांच्या शेतकऱ्यांना मिळाला न्याय

farmer
farmer
Updated on

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्‍यातील बेल्हे मंडल विभागातील दहा गावांतील शेतकऱ्यांना बांगरवाडीचे सरपंच जालिंदर बांगर यांच्या प्रयत्नांमुळे दोन वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. या शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे. शासन निर्णयाच्या आधारे सतत पाठपुरावा, निवेदने व आंदोलनाचे इशारे दिल्यामुळे त्यांना हे यश मिळाले आहे.

जुन्नर तालुक्‍यातील नऊपैकी सहा महसूल मंडल विभागात सन 2018मध्ये दुष्काळ जाहीर झाला होता. राज्य सरकारने नुकसान भरपाई देखील मंजूर केली होती. मात्र, ही सहा मंडळे दुष्काळ यादीत असून देखील नुकसान भरपाईबाबत महसूल प्रशासनाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला नव्हता. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले होते. याविषयी बांगर यांनी आवाज उठवून पाठपुरावा केला. शेतकऱ्यांना हक्काची नुकसानभरपाई न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी नुकसानभरपाईचे प्रस्ताव सादर करण्याचा आदेश तहसीलदार कोळेकर यांना दिला होता. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या आदेशानुसार बांगरवाडी, गुळुंचवाडी, गुंजाळवाडी, रानमळा, उंचखडक, आणे, आनंदवाडी, नळावणे, शिंदेवाडी व पेमदरा या गावांतील बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे अनुदान मंजूर झाले आहे. या गावांतील बहुवार्षिक पिकांचे 33 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने मदत द्यावी, असा प्रस्ताव महसूल, कृषी व पंचायत समितीच्या वतीने संयुक्त रित्या सादर केला होता. याबाबत तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी बैठक घेतली. यात नुकसानभरपाईबाबत माहिती दिली. या वेळी बांगर, अतुल भांबेरे, मंडल अधिकारी गंभिरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com