finance minister yashwant sinha
sakal
पुणे - अर्थव्यवस्थेची खरी बाजू समोर यायची असेल तर जनतेपुढे अर्थव्यवस्थेचे खरेखुरे आकडे समोर येणे गरजेचे असतात. मात्र, भारतात ज्याप्रकारे आकडे गोळा केले जातात ते विश्वासार्ह नाहीत. त्यामुळे देशाचे धोरण ठरविण्यावर परिणाम होत आहे. भारताचा ७.७ टक्के विकासदर असल्याचा सरकारी दावा दिशाभूल करणारा असून अर्थव्यवस्थेचा विकास दाखवणे हा आकड्यांचा खेळ असल्याची टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर पुण्यात केली.