कात्रज - सुखसागरनगर तसेच अंबामाता परिसरात अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या अतिक्रमणामुळे मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. .परिसरातील मुख्य रस्त्यावर सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणावर पथारी व्यावसायिक अनधिकृतरित्या व्यवसाय करतात. यामुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.अनेकदा नागरिकांनी या समस्येची तक्रार महापालिका व वाहतूक विभागाकडे केली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अनेकदा पाथारी आणि हातगाडी व्यावसायिकांना कारवाईच्या पूर्वसूचना देऊन कारवाई करण्यात येते..त्यामुळे हे व्यावसायिक आपल्या गाड्या बाजूला करतात आणि प्रशासन दिखावूपणाची कारवाई करते आणि पुन्हा गाड्या लावल्या जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होताना दिसत नाही. प्रशासन आणि पाथारीवाले अनाधिकृत हातगाडीवाले यांच्यात अर्थपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे या गोष्टी घडत असल्याचे नागरिक नाव न सांगण्याच्या अटीवर सर्सासपणे बोलतात..सततच्या तक्रारीनंतरही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही उदासीनता लक्षात घेता, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. परिसरात नियमबाह्य दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची पार्किंग केली जाते. त्यामुळे हा रस्ता अरुंद बनतो.त्यात पीएमपीची बस आल्यावर संपूर्ण रस्ता व्यापला जातो. त्यामुळे अंबामाता चौक कधी मोकळा श्वास घेणार आणि अतिक्रमणमुक्त होणार? की प्रशासन यशश्री सोसायटीप्रमाणे एखादा जीव जाण्याची वाट पाहत आहे? असा प्रश्न स्थानिक नागरिक श्रीराम कुलकर्णी यांनी केला आहे..प्रतिक्रियाअंबामाता परिसरातील नागरिकांना दररोज अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीमुळे ताणावाला सामोरे जावे लागत आहे. तक्रारी करूनही महापालिका व वाहतूक विभाग दुर्लक्ष करत आहेत. अनेकवेळा पोलिसांचीच गाडी या वाहतूक कोंडीत अडकते हे दुर्दैव आहे. ही गंभीर बाब असून याकडे लक्ष द्यावे, ही आमची मागणी आहे.- मगराज राठी, स्थानिक नागरिक.अंबामाता चौकातील अतिक्रिमणासंदर्भात आम्ही सातत्याने कारवाई करत असतो. मात्र, काही पथारीवाले पुन्हा त्याठिकाणी व्यवसाय करताना दिसून येतात. या संदर्भात अतिक्रमण निरिक्षकांनाही कारवाई ठोस होत नसल्यासंदर्भात नोटीसा बजावल्या आहेत.- राजेश कादबाने, सहायक आयुक्त, कोंढवा-येवलेवाडी, क्षेत्रिय कार्यालय.नागरिकांच्या प्रमुख मागण्या१) अनधिकृत पथारी व ठेले हटवावेत२) पदपथ नागरिकांसाठी खुला करण्यात यावा३) अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई व्हावी४) वाहतूक नियोजन सुधारावे५) अतिक्रमण रोखण्यासाठी नियमित कारवाई करावी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.