
माळशिरस : गौराई ,गणपती उत्सवाच्या काळात 200 ते 300 रुपये प्रति किलोने विकली गेलेली फुले सध्या बाजार भावा अभावी मातीमोल किमतीत विकावी लागत आहेत. फुलांचा तोडणी खर्च भागत नसल्याने उत्पादकांच्या वरती फुलांच्या फडामध्ये जनावरे सोडण्याची वेळ आली आहे.
कोरोना व त्यामुळे असलेल्या लॉक डाऊन यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरवातीला मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याने फुलांच्या लागवडी काही प्रमाणात कमी झाल्याने गणपती व गौराई या सणांच्या काळात झेंडू, कापरी, शेवंती वर्गीय विविध प्रकारचे फुले 200 ते 300 रुपये प्रति किलोप्रमाणे विकली गेली.
चार ते पाच दिवस अशी परिस्थिती राहिल्यानंतर गणपती विसर्जनाच्या शेवटच्या तीन दिवसापासून फुलांचे बाजारभाव मोठ्या प्रमाणावर ती कोसळण्यास सुरुवात झाल्यानंतर सध्या असणाऱ्या पितृपंधरवड्यात तर बाजारात फुलांना कोणीही विचारण्यास तयार नाही. यामुळेच फुलांचा तोडणी व वाहतूक खर्च भागत नसल्याने अनेक फुल उत्पादक शेतकऱ्यांनी संकट काळात ही अत्यंत कष्टाने उभी केलेली फुलशेती काढण्याची तर काही ठिकाणी जनावरे सोडण्याची वेळ आली आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान, फुलांच्या बाजारभावातील मोठ्या प्रमाणावर झालेल्या घसरणीमुळे फुल उत्पादकांसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सोसण्याची वेळ आली आहे.
(Edited by : Sagar Diliprao Shelar)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.