
कात्रज : जन्मताच एचआयव्हीसारखा गंभीर आजार, कुटुंबाने साथ सोडल्याने अनाथ उपेक्षितच जगणं पदरी आलं. मात्र, ममता फाउंडेशन संस्थेने आधार दिला. सांभाळ केला, शिक्षण दिले आणि स्वतः च्या पायावर उभे राहिलेले तरुण तरुणी सुखी आनंदी आयुष्याची स्वप्न साकारण्यासाठी लग्नाच्या बेडीत अडकले. ममता फाऊंडेशनने आधार दिल्यानंतर आता या मुलांना समाजानेही पूर्णपणे स्विकारले असल्याचे दिसून येत आहे. या सोहळ्याला अभिनेते, अभिनेत्री व समाजातील प्रतिष्ठात मंडळींनी उपस्थित राहत शुभाशीर्वाद दिले.