Bharat Solanke
sakal
पुणे - ‘दहावीनंतर घरची परिस्थिती इतकी बेताची होती की, शिक्षणाची दप्तरं बाजूला ठेवून ट्रकवर क्लीनर म्हणून काम सुरू केलं. पुढं चालक झालो; पण गाडी चालवतानाही स्वप्नांची सोबत आणि पुस्तकांची ओढ कधीच सुटली नाही. रात्री ट्रक थांबला की कवितेच्या ओळी कागदावर उतरायच्या. लोक विचारू लागले, ‘हे तूच लिहिलंय का?’ तेव्हाच मनाशी खूणगाठ बांधली, शिकावं तर लागणारच. हा अनुभव सांगताना डॉ. भारत सोळंके यांच्या डोळ्यांत संघर्षाची चकाकी दिसत होती.