
पुणे - स्वच्छ भारत अभियानाच्या निकालासाठी काहीच दिवस उरले असताना मात्र; घरोघरी ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्याची चिंताजनक बाब पुढे आली आहे.
कचऱ्याचे वर्गीकरण करताना सफाई कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. स्वच्छता अभियानात कचरा वर्गीकरणाला प्राधान्य असतानाही पुणेकर त्याकडे काणाडोळा करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कचरा वर्गीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या महापालिकेची चिंता वाढली आहे.
या अभियानात गेल्या वर्षी घसरलेली पत पुन्हा वाढविण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. कचऱ्याचे वर्गीकरण करून तो महापालिका आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गोळा होणाऱ्या कचऱ्यातून ओला-सुका वेगळा करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांनाही देण्यात आल्या आहेत; परंतु काही भागांतील घरांमधूनच कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणीही वाढल्या आहेत. कचरा वेचक सोजर शेंडगे म्हणाल्या, ‘‘सोसायट्या व वस्त्यांमधून कचऱ्याचे वर्गीकरण न करताच कचरा देतात. यात मेडिकल वेस्टसह काचा, सुया आदी घातक वस्तू असल्यामुळे आम्हाला इजा होते. अशा परिस्थितीत आम्हाला कचरा वेगळा करावा लागतो.’’
‘‘कचरा वर्गीकरणामध्ये नागरिकांकडून सहकार्य मिळत नसल्याने त्याचा ताण सफाई कर्मचाऱ्यांवर येतो. वर्गीकरण केल्यास कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे सोयीचे होते,’’ असे भगवान शेंडगे यांनी सांगितले.
रोज जमा होणारा कचरा सुमारे २१०० टन
प्रक्रिया होणारा कचरा सुमारे १४७३ टन
कचरा वेचक पुरुष व महिला ३५००
कचरा संकलनासाठी एकूण वाहने ५६५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.