
पुणे - ‘शेतकऱ्यांनी बियाणे विकत घेणे, ही संकल्पनाच पूर्वी नव्हती. उत्तम दर्जाच्या बियाण्यांचे वाण पिढीजात हस्तांतरित होत असे. त्यातून उत्पादित होणाऱ्या धान्यात पोषणमूल्य असायचे, ते सशक्त होते. या परंपरा मागासलेल्या असल्याची मोहोर त्यावर उमटविली गेली. त्यामुळे कंपन्यांच्या बियाण्यांशिवाय शेतकऱ्यांना आता पर्याय राहिला नाही,’’ असे पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. देबल देब यांनी सांगितले.
किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब यांच्या पुढाकारातून पर्यावरणवादी संस्थांच्या सहकार्याने आयोजिलेल्या १४व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपप्रसंगी डॉ. देब यांना ‘वसुंधरा सन्मान’ देण्यात आला. या वेळी अतुल किर्लोस्कर, आदित्य कौशिक, आरती किर्लोस्कर, गौरी किर्लोस्कर, वीरेंद्र चित्राव, माधव चंद्रचूड उपस्थित होते.
डॉ. देब म्हणाले, ‘‘शेतीतून शाश्वत उद्दिष्ट साध्य करावयाचे असल्यास शेतीचे पारंपरिक ज्ञान बी-बियाण्यांना प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित असताना कृषितज्ज्ञ आणि कृषी धोरणकर्ते बी-बियाणे उद्योजकांना पूरक ठरतील, अशी धोरणे आखत आहेत. ही धोरणे पाहता पारंपरिक बी-बियाण्यांबाबात कृषितज्ज्ञांनी दाखवलेली अनास्था चिंतनीय आहे. कृषितज्ज्ञ आणि कृषी धोरणकर्ते यांची धोरणे तांदुळच नव्हे; तर केळी, बटाटे आदी उत्पादनांबाबतीतही दिसून येतात.’’ या वेळी एन्ड्रीएस एवल्सदिग्दर्शित ‘द पायथन कोड’ हा या महोत्सवातील समारोपाचा चित्रपट दाखविला. किर्लोस्कर जीसीसी ट्रॉफी, पथनाट्य स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धा, रामन दी फोटो वॉक आणि राम नदी युवा संसद अशा विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. गौरी किर्लोस्कर यांनी प्रास्ताविक केले. त्रिवेणी माथूर यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.