
आळंदी : ‘‘जेव्हा जेव्हा माणसांमध्ये भेद करायला लागलो की आपण गुलामगिरीमध्ये गेलो. अशावेळी संतांनी आपल्याला एकत्रित राहण्याची शिकवण दिली. प्रत्येक माणसात पांडुरंग पाहणे, ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. तेथे जात, पात, पंथ, भाषा पाहत नाही. गरीब-श्रीमंती पाहत नाही. एकमेकांच्या पाया पडतात. हीच भारतीय संस्कृती आहे. ती जतन करण्यात वारकरी संतांनी मोठे योगदान आहे,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.